Sunday, 15 November 2020

धरती आबा भगवान बिरसा मुंडा

बिरसा मुंडा (Birsa Munda)

 (१५ नोव्हेंबर १८७५ – ९ जून १९००). बिरसा मुंडा हे आदिवासी समाजक्रांतीचे जनक व एक स्वातंत्र्यसेनानी आहेत. त्यांचा जन्म झारखंडमधील उलिहातु या छोट्याशा खेड्यात वडील सुगना व आई करमी या दांपत्यापोटी झाला. जन्म गुरुवारी म्हणजे बिस्युतवार किंवा बृहस्पतिवार या दिवशी झाला, म्हणून त्यांचे नाव ‘बिरसाʼ ठेवण्यात आले. बिरसा यांच्या कुटुंबाची परिस्थिती हलाखीची होती. त्यामुळे बिरसांच्या जन्मानंतर सर्व कुटुंब उदरनिर्वाहासाठी बिरसांची आत्या दासकीर हिच्या आयुभातु या गावी गेले. बासरी व टुईला वाजविणे, नृत्य, नकला, चित्र रेखाटणे, आखाड्यात जाणे इत्यादी छंदही त्यांच्या अंगी होते.

बिरसांना शिक्षणाची आवड होती. सुरुवातीला ते आयुभातुजवळ सलगा गावी जयपाल नाग या व्यक्तीने चालविलेल्या आश्रमात जात. पुढे बिरसांचे मोठे भाऊ कानु यांनी त्यांना जर्मन ईसाई मिशन स्कूलमध्ये दाखल केले (१८८६). तत्पूर्वी शाळेच्या अटीनुसार त्यांना ख्रिश्चन धर्म स्वीकारावा लागला. शाळेमध्ये जर्मन लुथेरियन मिशनचे अध्यक्ष फादर नोट्रोट यांनी भाषणामध्ये मुंडा आदिवासींबद्दल ठग, चोर, बेइमान इत्यादी शब्दांचा वापर केला. तेव्हा बिरसा यांनी फादर नोट्रोट यांना खडसावून प्रत्युत्तर दिले. त्यामुळे बिरसांना शाळेतून काढण्यात आले (१८९०).

पुढे त्यांनी शिक्षणासाठी अंगीकारलेल्या ख्रिश्चन धर्माचा त्याग केला. उदरनिर्वाहासाठी ते बांदगाव येथे वास्तव्यास होते (१८९०–९४). त्यांचा विवाह हिरीबाई नामक मुलीशी झाला; परंतु अल्प काळातच तिचे निधन झाले. बिरसा यांनी आनंद पांडे या वैष्णवपंथीयांकडून धार्मिक शिक्षण घेतले. हे शिक्षण घेत असताना मुंडा जमातीच्या परंपरागत जीवनपद्धतीमध्ये, धर्मामध्ये परिवर्तन व सुधारणा करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांच्या लक्षात आले. हिंदू, ख्रिश्चन व मुंडा आदिवासी या धर्मांतील चांगली तत्त्वे एकत्रित करून नव्या बिरसाईट (Birsaites) धर्माची स्थापना करून त्यांनी लोकसंघटन केले, तसेच मुंडा जमातीत एकता निर्माण केली. ईसाई धर्म हा विदेशी असल्यामुळे तो आपल्या पूर्वजांच्या परंपरेला कलंकित करणारा आहे, अशी लोकजागृती ते करू लागले. त्यामुळे ते भगवान बिरसा म्हणून ओळखले जाऊ लागले.

१८५७ च्या क्रांतीनंतर इंग्रजांनी छोटा नागपूर प्रदेशातील मुंडा आदिवासींच्या शेतजमिनी हिरावून घेतल्या होत्या. त्या परत मिळविण्यासाठी मुंडांचे प्रमुख ज्यांना ‘सरदारʼ म्हटले जात, त्यांनी इंग्रजांविरुद्ध संघर्ष सुरू केला. तो ‘सरदारी लढाईʼ म्हणून प्रसिद्ध झाला. या आंदोलनात्मक लढाईचा बिरसांच्या मनावर मोठा प्रभाव पडला होता. त्यांनी इंग्रजांच्या गुलामीत असलेल्या आदिवासी समाजाला मुक्त करण्यासाठी क्रांतिकारक चळवळीला सुरुवात केली. त्यामुळे अनेक मुंडा आदिवासींनी बिरसांबरोबर सरदार आंदोलनात सहभाग घेतला. बिरसांनी चालविलेले व्यापक आंदोलन दडपण्यासाठी इंग्रजांनी दोन नियम-अटी लागू केले : (१) गावागावांत जेवढ्या आदिवासींच्या जमिनी आहेत, त्यांवर सरकारी वन-अधिकाऱ्यांचा अधिकार आहे. या नियमामुळे मुंडा लोकांचा जगण्याचा अधिकार हिरावला जाऊन समाजाचे नुकसान होणार होते. (२) इंग्रजांनी अनेक ठेकेदारांना दारूचे अड्डे चालविण्यासाठी परवाने दिले. अशिक्षित मुंडा आदिवासी नेहमी दारूच्या नशेत राहावा, त्यामुळे ते आंदोलनापासून अलिप्त राहतील, असा त्यांचा हेतू होता. बिरसांनी या नियमांना विरोध करत इंग्रजांविरुद्ध आवाज उठविला. आदिवासी बांधवांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले.

१८९४ मध्ये आदिवासी भागात मोठ्या प्रमाणात दुष्काळ पडला. इंग्रजांकडून कोणतीही मदत मिळत नव्हती. उलट, इंग्रजांनी आदिवासींकडून जमीन महसूल ठरावीक तारखेलाच रोख स्वरूपात भरण्याची सक्ती केली.  त्यामुळे अनेक आदिवासींना आपल्या जमिनी सावकार व जमीनदार यांच्याकडे गहाण ठेवाव्या लागल्या. भरमसाठ व्याजदरांमुळे तारण जमिनी सोडवून घेणे आदिवासींना अशक्य बनले. जमीनमालकी असणारा आदिवासी भूमिहीन व वेठबिगार बनला. त्यामुळे बिरसांनी इंग्रजांविरुद्ध आदिवासी तरुण बांधवांचे संघटन केले. समाजबांधवांनी एकत्र येऊन धोकेबाज इंग्रजांना यमसदनी पाठवावे, त्यामुळे आपले राज्य येईल, असे बिरसा सांगत. त्यांच्या शब्दांमुळे अनेक मुंडांनी ठेकेदार व इंग्रजांच्या कामास जाणे बंद केले. इंग्रजांपेक्षा आपण बलाढ्य आहोत, असे सांगून ते समाजामध्ये नवचेतना निर्माण करीत. बिरसांनी स्वराज्याची घोषणा करून इंग्रज शासनापुढे सशक्त आव्हान निर्माण केले. त्यामुळे इंग्रज शासनाने बिरसांना बंदी करण्याचे ठरविले. ब्रिटिशांनी  बिरसा व त्यांच्या सहकाऱ्यांना पकडले (२६ ऑगस्ट १८९५). बिरसांच्या अटकेमुळे पुन्हा आदिवासी समाजात इंग्रजांविरुद्ध असंतोष निर्माण झाला. अखेर ३० नोव्हेंबर १८९७ रोजी बिरसांची सुटका झाली.

कैदेतून सुटल्यानंतर बिरसांनी सेवादलाची स्थापना केली. गावोगावी गुप्त बैठका घेऊन मुंडाराज्य स्थापन करण्याच्या शपथा घेण्यात आल्या. त्यामध्ये सुमारे ५,००० आदिवासी सामील झाले. बिरसांनी कायद्याची लढाई सोडून २५ डिसेंबर १८९९ पासून इंग्रज अधिकारी, इंग्रजधार्जिणे ठेकेदार, जमीनदार, सावकार व ख्रिश्चन धर्मप्रसारक यांच्याविरोधात आक्रमक पवित्रा घेत प्राणघातक हल्ले करण्यास सुरुवात केली. सिंगभूम, चक्रधरपूर, रांची, खुंटी, कोरा, तामाड या प्रदेशांतील पोलीसचौक्या जाळण्यात आल्या. या मुक्तीआंदोलनाला मुंडारी भाषेत ‘उलगुलानʼ असे म्हणतात. या आंदोलनात आदिवासींनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. पोलिसांच्या गोळीबारात व मुंडांच्या तिरकामठ्यांद्वारे हजारो पोलीस व मुंडा आदिवासी मारले गेले. अखेर बिरसांना शह देण्यासाठी इंग्रजांनी कूटनीतीचा वापर केला. बिरसांना जो कोणी पकडून देईल, त्यासाठी इंग्रजांकडून ५०० रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले. पैशाच्या लालसेपोटी मनमारू व जवाईकेला या गावातील काही युवकांनी बिरसा जंगलात असल्याची बातमी इंग्रजांना दिली.  ३ फेब्रुवारी १९०० रोजी बिरसांना पकडण्यात आले.

रांची येथे कैदेत असताना इंग्रजांनी त्यांचा अतोनात छळ केला. तेथेच त्यांचे निधन झाले.

बिरसा यांच्या आंदोलनाची ब्रिटिशांना गंभीरपणे दखल घ्यावी लागली. ब्रिटिशांनी ‘छोटा नागपूर टेनन्सी ॲक्टʼ मंजूर करून आदिवासींचे जमिनीवरील हक्क मान्य केले (१९०२). आदिवासी-हक्क, स्त्री-स्वातंत्र्य, मानवी प्रतिष्ठा यांच्यासाठी लढा देणारा पहिला आदिवासी नेता म्हणून बिरसा यांची ओळख आहे. रांची येथील डिस्टिलरी पुलाजवळ बिरसांची समाधी असून तेथे त्यांचा पुतळा उभारला आहे. तसेच रांची येथील केंद्रीय कारागृहास आणि आंतरराष्ट्रीय विमानतळास बिरसा मुंडा यांचे नाव देण्यात आले आहे.

संदर्भ :

Chandra, Bipan & others, India‘s Struggle for Independence : 1857 – 1947.

Guha, Ranjit, Subaltern Studies : Writing on South Asian History and Society,  
    Vol. 3, Delhi, 1994.

- संग्रहित from Social media

Thursday, 12 November 2020

गाणी दिवाळीची

आपल्या पुर्वजांनी ठेवलेला पुढील

पिढीसाठीचा अलिखित वारसा मी 

जतन करून ठेवलाय.लहानपणी मी

दिवाळीच्या सुट्टीत गावी आलो की

या सणाच्या दिवशी बुजुर्ग माणसां-

बरोबर हि गाणी म्हणत गाय-म्हशी

ओवाळायचो.

         ती गाणी मला जशी आठवली

तशी लिहुन काढली आहेत.आपणही

दिवाळीला आपल्या मुलांबरोबर ही

गाणी म्हणत गाय-म्हशी ओवाळावी.

व आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी

ठेवलेल्या चांगल्या संस्कृतीचा खजिना

जतन करून ठेवावा हिच अपेक्षा ।।

 

 #१. आली आली दिवाळी


दिन दिन दिवाळी

गाय म्हशी ओवाळी

गाई कुणाच्या, लक्ष्मणाच्या

चोळूनमोळून केल्या गुंजा।।


गाईख्याच्या काठीला खुळखूळ गुंजा

गाय ईली डुबा झाला

घरच्या धन्याला हरिक झाला

हरका हरका दळे गहू।।


आमच्या गावचे पंडीत पवू

पंडीताचे उभे खिळे

....... बोच्यात ठोकले खिळे

खिळे वाजे करा करा।।


...... पादे परा परा

परच्या हाती परसकांदा

नरच्या हाती नरस कांदा

देग म्हतारे पळीभर तेल।।


तेल नाही तर चावडीत चल

चावडीत होती निळी घोडी

लाथा मारी फडोफडी

तेल घेऊ घडोघडी 

हंडुरले ।।

-------------------------------

#२ ओवाळू दिवाळी...आनंदाची


गायख्या दादा झोपाटा उघड

झोपाटा उघड

गाई जाऊदे वरल्या रानी

वरल्या रानी।।


वरला रान कुळंबटाचा,कुळंबटाचा

गाई येऊ दे नदीच्या कडा 

नदीच्या कडा

नदीचे पाणी झिळमिळे झिळमिळे।।


त्याला लागला सोग्या मोर

सोग्या मोर

सोग्या मोराचे लांब लांब पख

एक पख आखडला आखडला।।


त्याला लावला गंभिऱ्या नाडा

गंभिऱ्या नाडा

पळत्या पाण्यातून हकितो गाडा

हकितो गाडा।।


गाडा पळे गाढवाटांना

सुशिट पळे अडवाटांना

अडवाटांना

अडवाटाची तोडली काठी

तोडली काठी।।


काठी गुतली शेवळाला

शेवळाला म्हातारा म्हातारी

देवळाला।

---------------------------------

#३ मोरी गाय ईली गेणुबा....


मोरी गाय ईली गेणुबा

मोरी गाय ईली।

मोरीला झालाय पाऱ्या गेणुबा

मोरीला झालाय पाऱ्या।।


पाऱ्याच्या गळयात गेठा गेणुबा

पाऱ्याच्या गळयात गेठा

गेठयाला मोडलाय काटा गेणुबा

गेठयाला मोडलाय काटा।।


काटया कुटयाच्या वनी गेणुबा

काटया कुटयाच्या वनी

गाई परसल्या पाणी गेणुबा

गाई परसल्या पाणी।।


पाणी पितोळो मासा गेणुबा

पाणी पितोळो मासा

गाई लागल्या देसा गेणुबा

गाई लागल्या देसा।।


देशादेशाचे येळू गेणुबा

देशादेशाचे येळू

गाईनी मांडले खेळू गेणुबा

गाईंनी मांडले खेळू।।


खेळू फुटतो पांडया गेणुबा

खेळू फुटतो पांडया

बैल डरतो नांदया गेणुबा

बैल डरतो नांदया।।


नांदया बैलाची येसन गेणुबा

नांदया बैलाची येसन

निळया घोडीवर बस गेणुबा 

निळया घोडीवर बस।।


निळया घोडीचा रवा गेणुबा 

निळया घोडीचा रवा

कोण्या शिळीचा पवा गेणुबा

कोण्या शिळीचा पवा।।


पव्या पाव्याच्या चिपळया 

आम्ही रशीम गोंडयाच्या मावळया

पाभारीला चार नळया

मोघाडाला तीन नळया।।


हानील बुक्की फोडील चाडा

नरशा आला पिऊन गेला

लाथ बुक्की देऊन गेला 

हंडुरले......

–-----------------------------------

#४ माझ्या मळयातुन जाई गोपाळा रे #


माझ्या मळयातुन जाई गोपाळा रे

तुझ्या मळयातुन जाई रे

जाईगुन जाई तिरगुन जाई

सर्वात लहान काई गोपाळा

उत्तर दे मग जाई रे।।


माझ्या मळयातली शिंगी गोपाळा रे

तुझ्या मळयातली शिंगी रे

शिंगून शिंगी तिरगुन शिंगी

सर्वात लहान मुंगी गोपाळा

ऐकून घे मग जाई रे


माझ्या मळयातुन जाई गोपाळा रे

तुझ्या मळयातुन जाई रे 

जाईगुन जाई तिरगुन जाई

माळानं पळतयं काई गोपाळा

ऊत्तर दे मग जाई रे।।


माझ्या औताचा येला गोपाळा रे

तुझ्या औताचा येला रे येलगुन येला 

तिरगुन येला माळानं पळतोय कोल्हा

गोपाळा ऐकून घे मग जाई रे।।


माझ्या मळयातुन जाई गोपाळा रे

तुझ्या मळयातुन जाई रे

जाईगुन जाई तिरगुन जाई 

दोन सडाचे काई गोपाळा 

ऊतर दे मग जाई रे।।


माझ्या मळयातली केळी गोपाळा रे

तुझ्या मळयातली केळी रे 

केळगुन केळी तिरगुन केळी

दोन सडांची शेळी गोपाळा ऐकून 

घे मग जाई रे


----------------------------


#५ "नाग्या बैलाचे कापले कान"


नाग्या बैलाचे कापलं कान,

तिथं तुकाराम खातो पान,पान

त्या पानाला कात ना चुना,चुना

सोम्या देतो खुणा,खुणा।।


खुणा वाल्याचा कात ओला,ओला

अंबु ताक प्याला,प्याला

ताक पेऊन गार झाला

येण्या देण्यानं लावल्या दशी,दशी।।


वाळया लंगडयानं घेतल्या म्हशी,म्हशी

त्या म्हशींची शिंगे खाली,खाली

दामु चाकरी घाली,घाली

त्या चाकरीत पडला रेडा, रेडा।।


 भावडयांनं घेतलाय घोडा,घोडा

त्या घोडयावर कोण कोण बसं,बस

भावडयान त्याची बायको बस,बस।।


Wednesday, 11 November 2020

भागोजी नाईक



आदिवासी म्हणजे भारतीय स्वातंत्र्यातील क्रांतीची धगधगती मशाल, भारताला स्वातंत्र मिळावे यासाठी सर्वाधिक रक्त सांडले ते आदिवासी क्रांतिकारक व विरांगणांचे, पण देशाला स्वातंत्र मिळताच या क्रांतिकारकांचा इतिहासच संपतो.
    असाच खोट्या इतिहासकारांनी दृष्टीपलिकडे ठेवलेला 
    आदिवासी योद्धा विर भागोजी नाईक(पवार).सिन्नर तालुक्यातील २५ किमी अंतरावर असलेल्या नांदुरशिंगोटे गावी त्यांचा जन्म स्वातंत्रपुर्व काळात झाला.ब्रिटीशांनी संपुर्ण देश काबिज केला होता .भारतातील सर्व राजे,महाराजे इग्रजांचे अंकीत-गुलाम बणुन आपला राजकारभार ब्रिटीशांच्या हुकूमाप्रमाने चालवत होते, पण याच देशात असा एक समाज होता, जंगलात राहणारा, कंदमुळे खाणारा , निसर्गाला देव माणुन पुजणारा आदिवासी,त्याने कधी इग्रजांची गुलामी पत्करली नाही आणि शेवट पर्यत लढत राहिला.आदिवासी बंडकर्यांच्या देशात अनेक टोळ्या होत्या आणि त्या ब्रिटीश सरकारला आवाहन देत होत्या .आदिवासी बंडखोरांचा बंदोबस्त करण्यासाठी इग्रजांनी आदिवासींचीच तरुण पोर सैन्यात भरती करायला सुरुवात केली .भागोजीला देखिल सैन्यात भरती करण्यात आले, पण ब्रिटीश अधिकारी भागोजीकडे सतत संशयाने बघत, आदिवासी बंडकर्यांना मदत करत असल्याचे आरोप होत, ब्रिटीशांसोेबत प्रामाणिक राहूण आपण आपल्याच देशबांधवांवर शस्र उचलत होतो याची भागोजीच्या मनात खंत होतीच, शेवटी देशाला स्वतंत्र्य मिळावे ही प्रत्येक देशवासियाचे ध्येय होते, तेच ध्येय उरी बाळगून भागोजी नाईकांनी बंडात उडी घेतली, 
       ब्रिटीश सरकारणे नुकतेच नाशिक, पुणे, अहमदनगर, ठाणे येथे सळो की पळो करुन सोडणार्या राघोजीचे बंड १८४८ मध्ये मोडून काडले होते, 
    त्याचवेळी इंग्रजांच्या पलटनीमध्ये तयार झालेला भागोजी बडकर्यात सामिल झाला, ५० भिल्ल व महादेव कोळी बंडकर्याना सोबत घेवून पुन्हा आदिवासी बंडकर्यांचा दबदबा नाशिक, नगर जिल्हात कायम ठेवला, नाशिक, पुणे, नगरचे रस्ते भागोजीने त्याब्यात घेतले, इंग्रजांचे दळणवळणाचे मार्ग आडवून त्यांना हैराण केले, नाशिक, पेठ, हरसुल येथे झालेल्या चकमकीत इंग्रजांना नमवले,
        भागोजीच्या वाढत्या कारवाया रोखण्यासाठी कॅ.हेन्री ला भागोजीवर सैन्य घेवून पाठवले, त्यावेळी भागोजी नाईक चासखिंडीत होता तेथेच इंग्रज व भागोजी नाईक यांच्यात लढाई झाली, त्यात भागोजीला मारण्यास आलेला हेन्री भागोजीच्या बंदुकीच्या गोळीचा शिकार झाला,  
   ही बातमी सर्वत्र वार्यासारखी पसरली, आदिवासी बंडकर्याचा उत्साह वाढत होता, पण भागोजीचा बंदोबस्त करण्यासाठी इंग्रज फितुरी, इनाम यासारख्या  सर्व चाली खेळू लागले . त्यात त्यांना यश देखिल आले, १८५८ चा उठाव इंग्रजांनी नुकताच मोडून काढला होता.भागोजीचेपण आता वय  ५७-५८ झाले होते, भाऊ महिपत व मुलगा बंडात कामी आला होता, तरी देखिल नाईकाचा लढा चालुच होता, 
      खबर्याने दिलेली बातमी खरी होती, भागोजीला व त्याच्या साथीदारांना गोदावरी तिरी सांगवीच्या बेटावर आफाट इंग्रज सैन्यान रातोरात घेरल, दिवस उजाडताच दोन्ही बाजूने बंदुकीच्या फैरी सुरु झाल्या, भागोजीचा एकएक साथीदार खाली कोसळत होता .
     सकाळी उगवलेला सुर्य मावळतीला चाला होता, 
    पण निकराने झुंजणार्या भागोजीचा पराक्रम पाहत होता,
   एका गोळीवर भागोजीचपण नाव लिहिलं होतं, 
   तिनं तिचा वेध साधला होता.
 बेटावरुन होणारा गोळीबार आता शांत झाला होता, 
   आदिवासींचा वाघ गोदातिरी धारातिर्थी पडला होता .
       तो दिवस होता ११नोव्हेंबर१८५९
अशा पराक्रमी आदिवासी विरास विनम्र अभिवादन.....